India Women Hockey Team
India Women Hockey Team Saam TV
क्रीडा | IPL

महिला हॉकी विश्वचषक : नवनीत कौरच्या २ गोलमुळे भारताचा शेवट गोड; जपानवर ३-१ ने विजय

साम टिव्ही ब्युरो

टेरेसा : महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र, नवनीत कौरने केलेल्या दोन गोलमुळे भारताने आपला शेवट गोड केला. भारतीय महिला हॉकी संघाने जपानचा 3-1 असा पराभव केला. हा विजय मिळवून सुद्धा भारतीय संघ महिला विश्वचषक स्पर्धेत नवव्या स्थानावर राहिला. जपान विरुद्धच्या सामन्यांत नवनीत कौरने 30 व्या आणि 45 व्या मिनिटाला तर दीप ग्रेस इक्काने 38 व्या मिनिटाला गोल केले. जपानसाठी यू असाइने 20 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. (India Women Hockey Team)

सुरुवातीला क्वार्टरच्या पहिल्या पाच मिनिटांत दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार आक्रमण केलं. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला लवकर आघाडी घेण्याची संधी मिळाली. पण वंदना कटारियाने मारलेला फटका जपानची गोलरक्षक इका नाकामुरा हिने वाचवला. पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याही संघाला यश मिळाले नाही.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने चांगली सुरुवात करून दोन मिनिटांत दोन संधी निर्माण केल्या, मात्र गोल होऊ शकला नाही. 20व्या मिनिटाला असाईने दिलेल्या पेनल्टी कॉर्नरवर जपानने आघाडी घेतली. काउंटर अॅटॅकमध्ये भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला मात्र गोल झाला नाही. हाफ टाईमपूर्वी नवनीतने बरोबरीचा गोल केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने अतिशय आक्रमक सुरुवात करत सहाव्या पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, पण पुन्हा एकदा संधी हुकली. मात्र, यादरम्यान दीप ग्रेस इक्काने आणखी एका पेनल्टी कॉर्नरमध्ये आणखी एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये नवनीतने दुसरा गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये जपानने पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला पण यश आले नाही. अखेर भारतीय संघाने हा सामना 3-1 अशा फरकाने खिशात घातला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT