भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना रविवारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे.
भारताने या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि सामना पावसामुळे रद्द झाला, तर ट्रॉफी कोणाला मिळणार? जाणून घ्या.
फायनलच्या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली, तर शक्य होईल तितके षटकं कमी करुन सामना खेळवला जाऊ शकतो. आयसीसीच्या नियमानुसार, फायनलचा सामना कमीत कमी २० षटकांचा खेळवणं गरजेचं आहे.
प्रत्येक संघाला २०-२० षटकं दिली जातील. हा सामना ९ मार्च म्हणजे रविवारी खेळवला जाणार आहे. मात्र सामना जर या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही, तर १० मार्चला राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. यादिवशी सामना खेळवला जाऊ शकतो.
जर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना बरोबरीत सुटला, तर नियमानुसार, सुपर ओव्हरनुसार, सामन्याचा निकाल लावला जाईल. दोन्ही संघांना १-१ षटक दिलं जाईल. जो संघ हा सामना जिंकेल, तो चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरेल.
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. त्यामुळे फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळू शकतो. भारतीय संघ साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे.
भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेश त्यानंतर पाकिस्तान आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.