Anushka Sharma Virat Kohli Saam TV
Sports

Virat Kohli: अनुष्का वहिनींचा पायगुण विराटसाठी ठरलाय लकी! स्वतःच केला खुलासा- VIDEO

नुकताच विराटने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli on anushka sharma: भारतीय संघातील दिग्गज फलंदाज विराट कोहली हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

अनेक विक्रम आपल्या नावे करणारा विराट गेल्या काही वर्षांपासून संघर्ष करताना दिसून येतोय. गेली २-३ वर्षे तो धावा करतानाही संघर्ष करताना दिसून येत आहे.

नुकताच त्याने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील एक खास किस्सा सांगितला आहे. (Latest sports updates)

विराट कोहलीने म्हटले की, जेव्हा माझ्या वडिंलाचे निधन झाले होते, त्यानंतर माझा आयुष्याकडे पाहन्याहा दृष्टीकोन बदलला होता. मात्र माझे आयुष्य बदलले नव्हते. आयुष्य आधीसारखेच होते. मला आयुष्यात काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित झाले. मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त झालो. मात्र माझ्या आयुष्यात आणि आजूबाजूंच्या गोष्टींमध्ये कुठलाच फरक जाणवला नव्हता.'

तर अनुष्का शर्माची भेट हा आयुष्यातील लाईफ चेंजिंग मुमेंट असल्याचं विराटने म्हटले आहे. विराट आणि अनुष्का हे दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता.

अनुष्काची भेट लाईफ चेंजिंग मुंमेंट..

'माझ्यासाठी अनुष्काची भेट हा लाईफ चेंजिंग मुमेंट आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्यात बदल व्हायला सुरुवात होते. कारण तुम्हा दोघांना एकत्र पुढे जायचं असतं. त्यावेळी तुम्हाला काही गोष्टींचा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे हाच माझ्या आयुष्यातील लाईफ चेंजिंग मुमेंट आहे.'असे विराटने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! मजूर बापाकडे I-Phoneचा हट्ट, १६ वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं

Manoj jarange Patil: आरक्षणाचा तुकडाच पाडणार; आता २९ ऑगस्टला फाईटच, मनोज जरांगे कडाडले

शिव मंदिरात ३ वेळा टाळी का वाजवली जाते?

Maharashtra Live News Update: गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

Nanded News: गावात भयंकर पुरस्थिती; पालकमंत्री लंडनहून सात दिवसानंतर पाहणीसाठी आले, गावकऱ्यांचा संताप अनावर|VIDEO

SCROLL FOR NEXT