parthiv patel twitter
क्रीडा

IND vs ENG : इथेच टीम इंडियाचं चुकलं! पराभवानंतर टीम इंडियाने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Ankush Dhavre

Parthiv Patel On Team India Defeat:

हैदराबाद कसोटीत इंग्लंडचं बॅझबॉल भारतीय संघावर भारी पडलं आहे. या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने दमदार खेळ केला.

मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाचा डाव गडगडला. या पराभवासह भारतीय संघ या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटूने भारतीय संघाला चुक लक्षात आणून देत मोलाचा सल्ला दिला आहे.

पार्थिव पटेलने जियो सिनेमावर बोलताना म्हटले की,'या सामन्यात ३ फिरकी गोलंदाजांची गरज होती यात काहीच शंका नाही. मात्र माझे विचार जरा वेगळे आहेत. तुम्ही सिराजला या सामन्यात ६-७ षटकं गोलंदाजी दिली.

अक्षर पटेलला कुलदीप यादवच्या आधी संधी दिली. त्यांची फलंदाजी चांगली आहे, असं रोहितने सामन्यापूर्वीच सांगितलं होतं. जर गोलंदाजीत विविधता हवी होती तर तुम्ही कुलदीप यादवला संघात स्थान द्यायला हवं होतं. तुम्ही सिराजच्या जागी एका फलंदाजाला संघात स्थान देऊ शकले असते. संघात अतिरिक्त फलंदाज असणं कधीही चांगलं असतं.'

या सामन्यातील पहिल्या डावात सिराजला केवळ ४ षटकं टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २८ धावा खर्च केल्या. तर दुसऱ्या षटकात त्याने ७ षटकं टाकण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २२ धावा खर्च केल्या. त्याने या सामन्यात १३ षटकं गोलंदाजी करत २ गडी बाद केले. यादरम्यान त्याने ३३ धावा खर्च केल्या. (Latest sports updates)

या सामन्यात अक्षर पटेलने फलंदाजी करताना पहिल्या डावात ४४ तर दुसऱ्या डावात १७ धावांची खेळी केली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावांची गरज होती. मात्र एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकून मोठी खेळी करता आली नाही. या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला हा सामना २८ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT