mumbai indians captain hardik pandya statement after win over sunrisers hyderabad in mi vs srh match amd2000 twitter
Sports

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

MI vs SRH, Hardik Pandya Statement: मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

अखेर हैदराबादविरुद्ध खेळताना मुंबईने आपला गड राखला. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी १७४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने १४३ धावांची भागीदारी केली आणि मुंबईला एकतर्फी विजय मिळवून दिला.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून कुठल्याही विकेटसाठी केली गेलेली तिसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच मुंबईच्या फलंदाजांनी इतकी मोठी भागीदारी केली आहे. दरम्यान या विजयानंतर हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.

पियूष चावलाचं केलं कौतुक..

या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करणाऱ्या पियूष चावलाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की,' मला नाही माहीत की इथून पुढे आमच्यासाठी समीकरण कसं असेल. मात्र आम्ही ज्याप्रकारे खेळ केला आहे, त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. आम्ही १५-२० धावा खर्च केल्या. मात्र आम्ही फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. मी आधी खेळपट्टी पाहतो आणि त्यानूसार गोलंदाजी करतो. पियूषने ज्या फलंदाजांना बाद केलं ते, आमच्याकडून सामना हिसकावून घेऊ शकत होते.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' टी-२० क्रिकेटमध्ये बदल करण्यापेक्षा सातत्य टीकवून ठेवणं अधिक महत्वाचं आहे. जे पियुषने आज करुन दाखवलं आणि त्यात तो यशस्वी ठरला. सूर्यकुमार यादव खरंच शानदार होता. मी भाग्यवान आहे की, सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज माझ्या संघात आहे. मी आशा करतो की, अशा अनेक इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळतील.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकअखेर १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने नाबात १०२ धावा आणि तिलक वर्माने नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT