KKR vs MI Saam Digital
Sports

KKR vs MI : मुंबईसमोर कोलकाताचं १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य; सामन्यात पावसाचा व्यत्यय

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians/IPL2024 : वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांच्या फटकेबाजीमुळे १६ षटकात कोलकाता संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्स समोर ठेवण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

पावसाच्या व्यत्ययामुळे मुंंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजचा सामना उशिरा सुरू झाला. सुरुवातीला एकापाठोपाठ विकेट पडल्यामुळे धावा खूपच कमी होत्या मात्र वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांच्या फटकेबाजीमुळे १६ षटकात कोलकाता संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य मुंबई इंडियन्स समोर ठेवण्यात आलं आहे.

सामना २ तास १५ मिनिटे उशिरा सुरू झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघ मैदानात उतरला होता. मात्र नुवान तुषारने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला तंबूत धाडलं. सुनील नरेनचा बुमराहच्या यॉर्करवर त्रिफळा उडाला. त्यानंतर श्रेयस अय्यर ७ धावांवर तंबूत परतला. कोलकाताची अवस्था ४० धावांवर तीन गडी बाद अशी झाली होती.

१२व्या षटकात नितीश रन आऊट झाला त्याने २३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकाराच्या मदतीवर ३३ धावा केल्या. तिलक वर्माने त्याला धावबाद केलं. पुढच्या षटकात पियूषने आंद्रे रसेलला २३ धावांनर तंबूत धाडलं. जसप्रीतने शेवटच्या षटकात १२ चेंडूंत २० धावा करणाऱ्या रिंकू सिंगला माघारी धाडलं. रमणदीपने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून कोलकाताला ७ बाद १५७ धावांपर्यंत पोहोचवलं. 

कोलकाताने १६ षटकांत ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने उत्तम प्रदर्शन करत प्रत्येकी २ बळी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT