jay shah yandex
क्रीडा

Jay Shah: जय शहांची पॉवर आणखी वाढणार! BCCI नंतर ICCचं मोठं पद मिळण्याची शक्यता

Ankush Dhavre

जय शहा हे २०१९ पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआयच्या) सचिवपदी विराजमान आहेत. मात्र आता अशी चर्चा सुरू आहे की, ते आयसीसीच्या चेअरमन पदासाठी अर्ज दाखल करून बिनविरोध निवडून येऊ शकतात. सध्या न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले हे आयसीसीचे चेअरमन आहेत. ते दुसऱ्यांदा या पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

क्रिकबजने दिलेला वृत्तानुसार येत्या जुलै महिन्यात कोलंबोत आयसीसीची एक बैठक होणार आहे. ज्यात या पदासाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीची तारीख ठरवण्यात येईल. माध्यमातील वृत्तानुसार जय शहा यांना आयसीसीची काम करण्याची पद्धत आवडलेली नाही. तसेच टी -२० वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयोजित करण्यावरूनही ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. जर जय शहा यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला आणि निवडून आले तर ते आयसीसीचे सर्वात युवा चेअरमन म्हणून ओळखले जातील.

आयसीसीच्या चेअरमन पदासाठीच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कुठलाही व्यक्ती ३ वेळेस चेअरमन होऊ शकत होता. या पदाचा कार्यकाळ हा २ वर्षांचा होता. मात्र आता नव्या नियमानुसार कुठलाही व्यक्ती दोन वेळेस आयसीसीचा चेअरमन होऊ शकतो. त्याचा कार्यकाळ हा ३ वर्षांचा असेल.

जय शहा यांनी २००९ मध्ये क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एंट्री केली होती. सुरुवातीला ते गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिवपदी विराजमान होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी बीसीसीआयमध्ये एंट्री केली आणि २०१९ मध्ये त्यांची बीसीसीआय सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT