सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं आहे. आता ५ मार्च रोजी दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होईल. भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला. टीम इंडियाने हा सामना ५ विकेट्सने जिंकून सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. या वर्ल्डकपच्या चारही सेमीफायनलमधील संघांची नावे निश्चित झाली आहेत.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ४ विकेट्स गमावून १९५ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने १९६ धावांचे हे लक्ष्य शेवटच्या षटकात पूर्ण केले. यासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे. या मैदानावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही हा सर्वाधिक धावांचा पाठलाग आहे.
भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजचा पराभव केला. १९६ धावांच्या प्रत्युत्तरात, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या जोडीने चांगली सुरुवात केली. पण अभिषेक शर्माने पुन्हा एकदा निराशा केली. तो ११ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा काढून बाद झाला. इशान किशननेही ६ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा केल्या.
दोन विकेट पडल्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी ३५ चेंडूत ५८ धावांची भागीदारी केली. १६ चेंडूत १८ धावांची संथ खेळी केल्यानंतर सूर्याही बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने १५ चेंडूत २७ धावांची जलद खेळी केली. हार्दिकने १४ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून शिवम दुबे आणि संजू सॅमसन नाबाद राहिले. सॅमसनने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह ९७ धावा काढल्या. दुबे ४ चेंडूत ८ धावांवर नाबाद राहिला.
संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. १०४ च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत १२ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. टी२० विश्वचषक धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी होती. यापूर्वी ८२ धावांचा हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता.