भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला विश्वचषकाच्या फायनलला पावसाचा अडथळा
सामन्याचा टॉससुद्धा पावसामुळे होऊ शकला नाही
अंतिम सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल
भारत तिसऱ्यांदा आणि दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच फायनलमध्ये
IND vs SA Women World Cup 2025 :भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील आयसीसी महिला विश्वचषक सामन्यावर पावसाचं विघ्न आहे. पावसामुळे अंतिम सामन्याचा टॉस देखील झाला नाही. टॉस होण्याआधीच मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
पावसाच्या शक्यतेमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. आजच्या सामन्यासाठी दोन तासांचा वाढीव वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर ओव्हरमध्ये कपात करण्यात येईल. राखीव दिवशी देखील पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघाना संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात येईल .
सामना सुरु होण्याच्या काही तासांआधी नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरु होता. या पावसामुळे मैदानातील काही भागात पाणी साचलं आहे. भारताचा संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पहिल्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे.
दोन्ही संघाने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकण्याचे वेध लागले आहेत. भारताने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धूळ चारली, त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हरमनप्रीत कौर आणि टीमला कोट्यवधी चाहत्यांचं मन जिंकण्याची संधी आहे. दुसरीकडे सामन्यावर पावसाचं सावट पाहायला मिळत आहे.
पाऊस थांबल्यास सामना सुरु करण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांसमोर तगडी धावसंख्या उभारण्याचं आव्हान असणार आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाला इतिहास रचण्याची मोठी संधी चालून आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.