Ind vs Pak Latest Updates if asia cup 2023 matches washed out will pakistan enter to the final what about team india Saam TV
Sports

India vs Pakistan Match: पावसाने खोडा घातला तर पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये; टीम इंडियाचं काय होणार?

IND vs PAK Match: श्रीलंकेच्या कोलंबोत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे भारत-पाक सामना रद्द होतो की काय? अशी चिंता अनेकांना लागली आहे.

Satish Daud

Asia Cup 2023 India vs Pakistan Match: आशिया कप २०२३ स्पर्धेतील सुपर-४ फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या ६ संघांपैकी अफगाणिस्तान आणि नेपाळ हे दोन संघ साखळी सामन्यातच बाहेर पडले आहेत. तर भारत, पाकिस्तानसह श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-४ फेरीत प्रवेश केला आहे. येत्या रविवारी म्हणजेच १० सप्टेंबरला भारतीय संघाचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.  (Latest Marathi News)

मात्र, या सामन्यापूर्वीच क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कोलंबोत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हा सामना पहिल्या सामन्याप्रमाणे रद्द होतो की काय? अशी चिंता अनेकांना लागली आहे.

सुपर-४ फेरीतील तब्बल ५ सामने श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहे. त्यामुळे हे सामने जर पावसामुळे रद्द झाल्यास कोणते दोन संघ फायनलमध्ये पोहचतील? असा प्रश्न क्रिडाप्रेमींना पडला आहे. पाकिस्तानने बांग्लादेशविरोधात सुपर-४ फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत.

अजूनही पाकिस्तानचे दोन सामने बाकी असून त्यांना टीम इंडिया आणि श्रीलंकेसोबत खेळायचे आहे. पण हे दोन्ही सामने रद्द झाल्यास पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये पोहचेल कारण, त्यांना या दोन्ही सामन्यात १-१ गुण मिळेल, म्हणजेच ४ गुणांच्या जोरावर ते फायनलमध्ये प्रवेश करतील.

दुसरीकडे पहिला सामना गमावल्यानंतर बांग्लादेशच्या खात्यात एकही गुण जमा झाला नाही. उलट त्यांचा नेट रनरेट खूपच कमी झाला आहे. त्यामुळे उर्वरित सामने रद्द झाल्यावर बांग्लादेशचे आशिया कप 2023 मधील आव्हान संपुष्टात येईल. तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना फायनलमध्ये पोहचण्याची संधी असेल.

दोन्ही संघांचे सुपर-४ फेरीतील ३-३ सामने बाकी असून हे सामने रद्द झाल्यास त्यांना ३-३ गुण दिले जाईल. अशा परिस्थितीत टॉस उडवून अंतिम फेरीत कोणता संघ प्रवेश करणार याचा निर्णय घेतला जाईल. कारण सामनेच न खेळल्याने रनरेटवचाही विचार करता येणार नाही. असं झालंच तर भारतीय संघ आशिया कप २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणार की नाही? हे फक्त नशीबावर अवलंबून असेल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT