team india twitter/bcci
क्रीडा

IND vs NED: नेदरलँडविरुद्ध टीम इंडियाची आतिषबाजी! पहिल्यांदाच टॉप ऑर्डरने केलाय असा कारनामा

Ankush Dhavre

Team India Top Order Record, India vs Netherland:

दिवाळीच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बंगळुरूत आतिषबाजी केली आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टॉप ऑर्डरच्या ५ फलंदाजांनी इतिहास रचला आहे. नेदरलँडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघातील सुरुवातीच्या पाचही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल,विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या पाचही फलंदाजांनी ५० धावांचा आकडा पार केला आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. भारतीय संघातील सुरुवातीच्या पाचही फलंदाजांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माने ५४ चेंडूत ६१ धावा केल्या.

शुभमन गिलने ३२ चेंडूत ५१, विराट कोहलीने ५६ चेंडूत ५१ धावा चोपल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने ५० धावांचा आकडा गाठला. यासह वर्ल्डकप स्पर्धेतील ४८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघातील सुरुवातीच्या ५ फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं आहे.

यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत असा कारनामा कुठल्याच संघाला करता आला नव्हता. १९७५ मध्ये पहील्यांदा वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ४८ वर्षे उलटून गेली आहेत. अजूनही कुठल्याच संघातील टॉप ५ फलंदाजांनी ५० धावांचा पल्ला गाठला नव्हता. (Latest sports updates)

भारतीय संघाने उभारला ४१० धावांचा डोंगर...

भारताचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटक अखेर ४ गडी बाद ४१० धावांचा डोंगर उभारला.

ही भारतीय संघाची वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने नाबाद १२८ धावांची तुफानी खेळी केली. तर केएल राहुल १०२ धावा करत माघारी परतला.

या दोघांनी मिळून २०८ धावा जोडल्या. ही वर्ल्डकप स्पर्धेत चौथ्या विकेटसाठी भारतीय फलंदाजांकडून केली गेलेली सर्वात मोठी भागीदारी ठरली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT