hardik pandya twitter
Sports

IND vs BAN 1st T20I: टीम इंडियाची यंगिस्तान जोमात! हार्दिकचा फिनिशिंग टच अन् बांगलादेशवर ७ विकेट्सने विजय

India vs Bangladesh 1st T20I: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st T20I: कसोटी मालिकेत बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता टी-२० मालिकेतही भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना ग्वालियरच्या मैदानावर पार पडला. पहिल्या डावात भारताच्या गोलंदाजांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

टीम इंडियाला जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावा करायच्या होत्या. याध धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानात आली. दोघांनी मिळून २५ धावा जोडल्या. मात्र त्यानंतर अभिषेक शर्मा धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसनने डाव सांभाळत २९ धावांची खेळी केली.

कर्णधार सूर्यकुमार यादवनेही तुफान फटकेबाजी करत ३ गगनचुंबी षटकार खेचत २९ धावांची खेळी केली. शेवटी हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डीने भागीदारी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी

या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत, भारतीय गोंलदाजांनी बांगलादेशचा डाव १२७ धावांवर हाणून पाडला. बांगलादेशकडून फलंदाजी करताना, मेहदी हसन मिराजने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. तर कर्णधार शांतोने २७ धावांची खेळी केली.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्या, मयांक यादव आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT