भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १८५ धावांवर आटोपल आहे. या सामन्यातही भारतीय संघातील फलंदाज फ्लॉप ठरले. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शानदार फलंदाजी केली.
या सामन्यात रोहित शर्माला संधी दिली गेली नव्हती. रोहितला प्लेइंग ११ मधून बाहेर केल्यानंतर त्याच्य जागी शुभमन गिलला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली. तर नेतृत्वाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली. सुरुवातीच्या ४ सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.
भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी केएल राहुल आणिा यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली. मात्र भारताला अवघ्या ११ धावांवर पहिला धक्का बसला. केएल राहुल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर यशस्वी जयस्वाल अवघ्या १० धावा करत माघारी परतला. सलामी जोडी फुटल्यानंतर, शुभमन गिल आणि विराट कोहली मिळून डाव सांभाळला. मात्र दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. गिल २० तर विराट २७ धावांवर तंबूत परतला.
भारताकडून रिषभ पंत सर्वात यशश्वी फलंदाज ठरला. त्याने ४० धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने २६ आणि वॉशिंग्टन सुंदरने १४ धावांची खेळी केली. शेवटी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. बुमराहने २२ धावांची खेळी करत संघाचा डाव १८५ वर पोहोचवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.