भारताने पुन्हा एकदा गाबावर कब्जा केला आहे. भारतीय संघ या सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर होता. मात्र केएल राहुल- रविंद्र जडेजा यांच्या फलंदाजीमुळे आणि जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाला हा सामना ड्रॉ करण्यात यश आलं आहे.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय जोडी मैदानावर आली होती. मात्र पावसामुळे खेळ पुन्हा थांबला आणि हा सामना ड्रॉ राहिला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानावर आली. दोघांनीही संघाला सावध सुरुवात करुन दिली.
मात्र २.१ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये परतले. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झालाच नाही. भारताने बिनबाद ८ धावा केल्या होत्या. अजूनही ५२ षटकांचा खेळ शिल्लक होता. मात्र दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हात मिळवले आणि सामना ड्रा झाला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला फॉलोऑन वाचवण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ७७ धावांची खेळी केली.
भारतीय संघाचा डाव शेवटी फसला होता. मात्र शेवटी फलंदाजी करताना, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने शानदार फलंदाजी केली आणि फॉलोऑन टाळण्यात मोलाची भूमिका बजावली. या शानदार भागीदारीच्या बळावर भारतीय संघाला २६० धावांपर्यंत मजल मारता आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.