
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहेा. या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ७ गडी बाद ८९ धावांवर घोषित केला आहे.
हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला २७५ धावांची गरज आहे. शेवटच्या दिवशी ५४ षटकांचा खेळ शिल्लक आहे.
या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघाचा डाव २६० धावांवर आटोपला. भारताने चौथ्या दिवशीच फॉलोऑन टाळला होता. दरम्यान १८५ धावांनी आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला.
मात्र हा प्रयत्न फसला. कारण ऑस्ट्रेलियन फलंदाज एकापाठोपाठ विकेट्स गमावल्या. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप तिघेही चमकले. भारतासमोर आता २७५ धावांचं आव्हान आहे.
भारतीय फलंदाज हा सामना जिंकण्यासाठी जाणार, की सामना वाचवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव २६० धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
मात्र केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. केएल राहुलने या डावात फलंदाजी करताना १३९ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर रविंद्र जडेजाने १२३ चेंडूंचा सामना करत ७७ धावांची खेळी केली. या दोघांनी भारतीय संघाला सामन्यात कमबॅक करुन दिलं.
या सामन्यात भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट होतं. मात्र जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने मिळून फॉलोऑन टाळला. भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी २४६ धावा करायच्या होत्या. त्यावेळी शेवटची जोडी मैदानावर होती.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार आक्रमण केलं. मात्र बुमराह आणि आकाश दीपची जोडी मैदानावर टिकून राहिली. दोघांनी मिळून ३९ धावांची भागीदारी केली आणि फॉलोऑन टाळला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.