IND vs AUS Saam tv
Sports

IND vs AUS: भारताच्या गोलंदाजीपुढे कांगारुंच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, टीम इंडियाची मालिकेत विजयाची दुर्री

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना घाम फोडला. टीम इंडियाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

India vs Australia 2nd T20 Match:

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कांगारुंच्या फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. टीम इंडियाच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी २० षटकात फक्त १९१ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर ४४ धावांनी टीम इंडिया जिंकली. टीम इंडियाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २० षटकात २३६ धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियासाठी यशस्वी जयस्वाल,ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने धुव्वाधार खेळी खेळली. तिघांनी अर्धशतकीय धावा काढल्या. यंगीस्थान टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला २० षटकात ४ गडी गमावून २३५ धावा केल्या होत्या.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाने २० षटकात ९ गडी गमावून फक्त १९१ धावा केल्या. यामुळे टीम इंडियाने तब्बल ४४ धावांनी सामना जिंकला.

टीम इंडियासाठी रवि बिष्णोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले . भारताने मालिकेत सलग दुसरा सामना जिंकला आहे. यामुळे टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियासाठी मार्कसने २५ चेंडूत ४५ धावा चोपल्या. तर टिम डेव्हिडने ३७ धावा केल्या. याच्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना २० धावांच्या पुढे मजल मारता आली नाही.

ऑस्ट्रेलियाला भारताकडून सर्वात मोठं आव्हान

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ गडी गमावून २३५ धावा केल्या. आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात टीम इंडियाने सर्वात मोठं आव्हान उभारलं. याआधी टीम इंडियाने २० सप्टेंबर २०२२ रोजी मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात ६ गडी गमावून २११ धावा केल्या होत्या.

भारताच्या तीन फलदाजांची दमदार अर्धशतके

मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. प्रथम यशस्वी जयस्वालने २४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं अर्धशतक आहे.

यशस्वी २५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने अर्धशतक ठोकलं. ईशानने ३२ चेंडूत ५२ धावा केल्या. तर ऋतुराजने ४३ चेंडूत ५८ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंहने ९ चेंडूत ३१ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT