Hardik Pandya Statement On Defeat: भारत विरूद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अंतिम टी-२० सामना रविवारी फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यासह भारतीय संघाला ही मालिका २-३ ने गमवावी लागली आहे. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने पराभवाचं कारण सांगत मोठं वक्तव्य केलं आहे.
हा सामना झाल्यानंतर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, 'जेव्हा मी आलो तेव्हा आम्ही लय गमावली होती. आम्हाला परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. आम्ही स्वत:ला आव्हान देत आणखी चागंलं करण्याचा प्रयत्न करत राहू. मला याबाबत जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. संघातील खेळाडू कसे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे. आमच्याकडे आता पुरेसा वेळ आहे. कधी कधी हरणं चांगलं असतं.'
तसेच तो पुढे म्हणाला की, 'आम्हाला खुप काही शिकायला मिळालं आहे. संघातील खेळाडूंनी चांगला खेळ केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. विजय पराभव होत राहतात. आगामी टी-२० वर्ल्डकप इथेच होणार आहे. मी अशी आशा करतो की, प्रेक्षक मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी येतील. सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचे मी आभार मानतो.' (Latest sports updates)
भारतीय संघाचा पराभव..
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटक अखेर १६५ धावा केल्या होत्या.
यादरम्यान सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडीज संघाकडून ब्रँडन किंगने नाबाद ८५ धावांची खेळी करून संघाला सामना जिंकून दिला. वेस्टइंडीजने या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यासह ही मालिका ३-२ ने खिशात घातली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.