hardik pandya statement on defeat against kolkata knight riders in kkr vs mi match amd2000 saam tv news
Sports

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पंड्या भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

KKR vs MI, IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स् आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने असेल होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना १६-१६ षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर ७ गडी बाद १५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला १६ षटकअखेर ८ गडी बाद १३९ धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्स संघासाठी हे हंगाम वाईट स्वप्नापेक्षा कमी राहिलेलं नाही. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबईचा हा ९ वा पराभव ठरला आहे. येत्या १७ मे रोजी मुंबईचा संघ आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. हा मुंबईचा या हंगामातील शेवटचा सामना असेल. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

या पराभवानंतर बोलताना तो म्हणाला की, ' आमच्याकडे चांगली फलंदाजी होती. मात्र आम्ही त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. विकेट थोडा वर खाली होता. त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर फसून येत होता. त्यामुळे आम्ही प्रोजेक्टेड स्कोअरनुसार फलंदाजी करणं गरजेचं होतं. परिस्थीती पाहता धावसंख्या बरोबर होती. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता, तो ओला होऊन मैदानात येत होता. त्यामुळे गोलंदाजांना गोलंदाजी करणं कठीण होत होतं. मात्र ते सातत्याने विकेट्स घेत होते.

मुंबई इंडियन्स आपला शेवटचा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १७ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' काहीच नाही, फक्त जायचं आणि जितकं होईल तितका आनंद घ्यायचा आणि चांगलं क्रिकेट खेळायचं. सुरुवातीपासून मी हेच म्हणतोय. मला नाही वाटत, आम्ही या हंगामात चांगलं क्रिकेट खेळलो.' मुंबई इंडियन्स संघाने हा हंगामात १३ सामने खेळले. यादरम्यान या संघाला केवळ ४ सामने जिंकता आले. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT