भारत को छोडना नहीं, अशी मागणी पाक चाहत्या पाकिस्तानी खेळाडूकडे भरमैदानात केलीय... आशिया कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे... येत्या रविवारी दुबईत हा हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे.. मात्र त्याआधीच पाकिस्तान चाहत्याच्या या विधानामुळे वाद निर्माण झालाय...
ग्रुप स्टेजमध्ये आणि सुपर फोरमध्ये पाकिस्तानला भारतानं पराभवाची धूळ चारलीय आणि आता फायनलध्येही टीम इंडियाचं पारडं जड आहे... त्यातच टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाला प्रतिस्पर्धी मानत नसल्याचं सांगत डिवचलंय...
पाकिस्तान क्रिकेट संघाला आतापर्यंत केवळ दोनदा आशिया कपवर नाव कोरता आलंय... तर टीम इंडियाने तब्बल 8 वेळा आशिया कप जिंकला असून आता नवव्यांदा ट्रॉफी उचलण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.. त्यामुळे मैदान खेळाचं असो की युद्धाचं जिंकणार तर भारतच हे नक्कीय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.