Government Job Google
naukri-job-news

Government Job: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात मोठी भरती; कोणत्या जागा? अटी-शर्ती काय? जाणून घ्या सर्व प्रोसेस

Maharashtra Maha Security Bharti: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात शासनात नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ७ जागांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. १८ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे गरजेचे आहे. MSCIT प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

२५ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,००० ते ३५,००० रुपये पगार मिळणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२४ आहे.

सध्या रेल्वेतदेखील भरती सुरु आहे. रेल्वेत ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना मुदतीपूर्वी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT