तुम्ही हिंदू नाहीच, भर लोकसभेत PM मोदींसमोर राहुल गांधी यांचं रोखठोक भाषण
Rahul Gandhi Lok Sabha speech Saam Tv
देश विदेश

Video: तुम्ही हिंदू नाहीच, भर लोकसभेत PM मोदींसमोर राहुल गांधी यांचं रोखठोक भाषण

Satish Kengar

''भगवान शंकर म्हणतात, घाबरू नका, घाबरवू नका आणि जे लोक आपल्याला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा, द्वेष आणि असत्य पसरवतात'', असं आज लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.

आज लोकसभेत आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर भाषण करताना ते म्हणाले की, भाजप हिंसा आणि द्वेष पसरवत आहे.

लोकसभात आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले की, 'माझ्यावर हल्ला करण्यात आला. सरकार आणि पंतप्रधानांच्या आदेशावरून माझ्यावर २० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले. २ वर्षांची शिक्षा...माझी ५५ तास चौकशी झाली. मला भाजप आणि आरएसएसला सांगायचे आहे की. भारताच्या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्या विचारांचा वापर केला आहे.'' यावेळी त्यांनी सभागृहात भगवान शंकराचे चित्र दाखवले.

ते म्हणाले की, ''एकदा मोदीजी आपल्या भाषणात म्हणाले की, भारताने कधीही कोणावर हल्ला केला नाही. याचे कारण भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला की, घाबरू नका, घाबरवू नका.''

राहुल गांधी असं म्हणाल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. राहुल गांधींचे वक्तव्य ऐकून पंतप्रधान मोदीही उभे राहिले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते संतापले आणि म्हणाले की, अशा आक्षेपार्ह गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर सभागृहाचे नियम लागू होत नाहीत का? राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी. अशा प्रकारे सभागृहाचे कामकाज चालू दिले जाणार नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT