Heat Wave Saam Tv
देश विदेश

Heat Wave: कडक सूर्य, तीव्र उष्णता... 10 राज्यांमध्ये उष्णतेची लाट; आयएमडीचा इशारा

Latest Wather Update in Marathi: या राज्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.

Shivani Tichkule

IMD Heatwave Alert: उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाढवण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय हवामान विभागाने (IMD) काही राज्यांसाठी उष्णतेबाबत अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.

IMD नुसार, जेव्हा कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते आणि सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश जास्त असते तेव्हा उष्णतेची लाट निर्माण होते. यासोबतच नागरिकांना उन्हात बाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

झारखंड- आजपासून तीन दिवस म्हणजे १९ जून ते २१ जून या कालावधीत झारखंडच्या विविध भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. झारखंड सरकारने रविवारी (18 जून) आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या 21 जूनपर्यंत वाढवल्या आहेत.

छत्तीसगड - पुढील तीन दिवसांत काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. सरकारने लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. छत्तीसगडमध्ये जांजगीर-चंपा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. (Heat Wave)

महाराष्ट्र- विदर्भात पुढील तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेची तीव्रता जाणवेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने उष्माघातही होत आहे. त्यामुळे नागरिकांना उष्ण लाटांची झळ सोसावी लागणार आहे.

ओडिशा- पुढील तीन दिवसांत ओडिशाच्या (Odisha) विविध भागात उष्णतेची लाट कायम राहील. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ४५ अंशांवर तापमानाची नोंद झाली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (16 जून) हवामान लक्षात घेऊन शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्या आणखी दोन दिवस वाढवल्या होत्या.

तेलंगणा- तेलंगणामध्ये बुधवारपर्यंत (२१ जून) विविध भागात भीषण उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्ये पारा 40 च्या पुढे गेला आहे. शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे.

आंध्र प्रदेश - पुढील दोन दिवस आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील. दोन दिवसांनंतर हवामानात किंचित सुधारणा दिसून येईल.

बिहार- दोन दिवसांत आपल्याला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. पूर्वेकडील राज्यात, गेल्या तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाटण्यातील शाळाही 24 जूनपर्यंत बंद राहणार आहेत.

पश्चिम बंगाल- पश्चिम बंगालमध्येही पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पश्चिम बर्दवान, बीरभूम, मुर्शिदाबाद, मालदा आणि दो दिनाजपूरच्या काही ठिकाणी नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे.

पूर्व मध्य प्रदेश - पुढील दोन दिवसांत उष्णतेची लाट जाणवेल. येथे जून महिन्यातच उन्हाने राज्यातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा कडाका आणि वाढत्या तापमानातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

पूर्व उत्तर प्रदेश - पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेच्या स्थितीपासून कोणताही दिलासा नाही. येथे बलिया जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे अवघ्या 4 दिवसांत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT