Water Crisis Saam Digital
देश विदेश

Delhi Water Supply: खबरदार! पाण्याचा अपव्यय कराल तर... भरावा लागेल 2000 रुपयांचा दंड, 200 पथकांची असणार करडी नजर

Sandeep Gawade

कडाक्याच्या उन्हात देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपवय सुरू आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी 200 पथकं तयार करण्यात आली असून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर पथकांचं सकाळपासून लक्ष राहणार आहे. पाण्याची नासाडी करताना कोणी सापडलं तर त्याला 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. ३० जूनपासून मुंबईतही पाणी कपात सुरू करण्यात आली आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई महानगरपालिका पाण्याचा अपवय टाळण्यासाठी पावलं उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री अतिशी यांनी जल मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. पाणी वाया घालवताना कोणी सापडलं तर त्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 200 पथके तैनात करण्याच्या सूचना अतिशी यांनी दिल्या आहेत. जे लोक पाईपने गाड्या धुतात, पाण्याच्या टाक्या अव्हरफ्लो झाल्यानंतरही लक्ष देत नाहीत. बांधकाम किंवा व्यावसायिक गरजांसाठी घरगुती पाणीप वापरतात त्यांच्यावर ही टीम नजर ठेवणार आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून ही पथके सर्वत्र तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांना बांधकाम किंवा व्यावसायिक ठिकाणी कोणतेही अवैध पाणी कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. आजकाल लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पाण्याचा अधिक वापर करतात. अशा स्थितीत पाण्याचा अपव्यय अधिक होतो. दिल्लीत असे अनेक भाग आहेत जिथे टाक्यांच्या मदतीने पाणीपुरवठा केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddiqui Death:सलमान खानला मारण्याची सुपारी, पानिपतमधून पनवेल पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT