पळून जाऊन लग्न (marriage) करण्याच्या घटना हल्ली सामान्य झाली आहे. पण लग्न झाल्यानंतर पळून जाण्याच्या घटना फार कमीवेळा घडतात. त्यामागे कारणेही तशीच असतात. असाच प्रकार मध्यप्रदेशातून (Madhyapradesh) समोर आला आहे. मध्य प्रदेशातील भिंड (Bhind) जिल्ह्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी अचानक पळून गेली. मात्र रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलीसांनी तिला पकडल्यानंतर संपुर्ण प्रकार समोर आला. (The bride absconded on the wedding night)
भिंड जिल्ह्यातील गोरमी (Gorami) भागात संबंधित तरुणी (अनिता) राहत होती. अनिताच्या कुटुबांतील एका उदल खटीक नावाच्या नातेवाईकाने कचनाव येथील एका दिव्यांग तरुणासोबत (सोनू जैन) तिचे लग्न ठरवले. त्याबदल्यात खटीकने सोनूकडून ९० हजार रुपये घेतले.
मंगळवारी अचानक उदल खटीक अनिता आणि अन्य दोघांना घेऊन सोनूच्या घरी पोहचला. त्याच्या कुटुंबीयांसमोरच त्याने दोघांचे लग्न लावून दिले. लग्नाचे सर्व विधी पार पडले. कुटुंबातील ज्येष्ठांनी वधू वरांना आशिर्वाद दिले. लग्नाचे सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर वधू वर झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. तोपर्यंत कुटुंबातील इतर लोकही झोपले होते.
तितक्याच अनिताने सोनूला तिला बरे वाटत नसल्याचे सांगितले. पाणी प्यायल्यास आणि थोडी मोकळी हवा मिळाल्यास तिला बरे वाटेल, असे तिने सोनूला सांगितले आणि अनिता खोलीतून बाहेर पडली. बराच वेळ झाला तरी अनिता खोलीत कशी आली नाही हे पाहण्यासाठी सोनूदेखील बाहेर पडला. त्याने घरात, गच्चीवर आणि बाहेर पाहिले मात्र त्याला अनिता मिळाली नाही. काही वेळ शोधाशोध केल्यानंतर अनिता घराच्या गच्चीवरुन पळून गेल्याचे सोनूच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले.
मात्र दुसरीकडे अनिताला पळून जात असताना तेथील स्थानिक पोलीस गस्त घालत होते. त्यांनी अनिताला पकडले आणि पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. अनिता ही पैसे घेऊन लग्न कऱणारी नवरी ठरली.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.