Thalapathy Vijay meets Governor amid uncertainty over majority as Tamil Nadu political battle intensifies saam tv
देश विदेश

तमिळनाडूत मोठा राजकीय भूकंप! थलापती विजय यांना हादरा? आता पर्याय काय? डीएमके बाजी उलटवणार

Tamilnadu Political Crisis Vijay Majority Dmk Strategy: तमिळनाडूत सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असून विजय थलपती यांना बहुमत सिद्ध करण्यात अडचणी येत आहेत. डाव्या पक्षांनी डीएमकेला पाठिंबा दिल्याने सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

तमिळनाडूच्या राजकारणाला अनपेक्षित वळण लागत आहे. टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी तमिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची परवानगी मिळालेली नाही. विजय यांच्याकडे ११३ आमदारांचा पाठिंबा असून, सरकार स्थापन करण्यासाठी ११८ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

काँग्रेसने पाठिंब्याचे आश्वासन देऊनही, विजय यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या त्यांच्या पक्षाला ११८ जागांचा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी किमान १० जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या पाच जागांमुळे त्यांनी आपली संख्या ११३ वर नेली आहे.

डाव्या पक्षांकडून मोठी घोषणा

मात्र, अजून पाच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेस व्यतिरिक्त, अपक्षांसहित विजयच्या टीममध्ये आणखी कोण असेल हे अस्पष्ट आहे. टीव्हीके पक्ष डीएमकेच्या इतर प्रमुख मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. सीपीआय (दोन जागा), सीपीएम (दोन जागा) आणि व्हीसीके (दोन जागा). डाव्या पक्षांनी या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

आम्ही डीएमके आघाडीमध्येच राहू

डाव्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्यास नकार देणारे निवेदन जारी केले आहे, ही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. सीपीआय आणि सीपीएमने डीएमके आघाडीतच राहण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीत विजय यांना बहुमत सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.

राज्यपालांनी विजयला काय म्हटले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यांनी सांगितले आहे की त्यांना सध्या ११८ लोकांचा पाठिंबा आहे, परंतु त्यांनी या पक्षांकडून पाठिंब्याची पत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे गुरुवारी (७ मे) विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता कमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांनी टीव्हीकेच्या नेत्यांना परत पाठवले असून, विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ आमदारांकडून पाठिंब्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच शपथ घेणे योग्य ठरेल, असे त्यांना सांगितले आहे. यामुळे तमिळनाडूमध्ये कोण सरकार स्थापन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT