Tamil Nadu Sarpanch Allegedly Beaten Saam Tv
देश विदेश

Shocking: पाणी पुरवठ्यावरून सरपंचाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

Tamil Nadu Sarpanch Death After Allegedly Beaten: पाणी पुरवठा अनियमित होत असल्याने सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सरपंचाच्या डोक्यात वीट घालण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या सरपंचाचा मृत्यू झाला.

Priya More
  • तामिळनाडूत पाणी पुरवठ्यावरून सरपंचाची हत्या

  • तिरुनेलवेलीमध्ये सरपंचावर विटेने हल्ला

  • पाणीटंचाईच्या वादातून सरपंचाला संपवलं

  • सरपंच महाराजन हत्या प्रकरणात एसाकी पांडियनला अटक

  • तामिळनाडूतील पाणी संकटाने घेतला सरपंचाचा बळी

पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांनी सरपंचाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सरपंचाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. पिण्याच्या पाण्याच्या अनियमित पुरवठ्यावरून झालेल्या वादातून ही भयंकर घटना घडली. सरपंच महाराजन यांच्यावर विटां0नी हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपी एसाकी पांडियनविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी एसाकी पांडियन हा गेल्या आठवड्यापासून परिसरातील पाणीटंचाईमुळे नाराज होता आणि त्याचा सरपंच महाराजाजन यांच्याशी वाद होता. दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या एसाकी पांडियनने महाराजन यांच्यावर विटेने हल्ला केला. या हल्ल्यात महाराजन गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सरपंचाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी एसाकी पांडियनला अटक केली. पोलिस पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले असून डीएमके खासदार कनिमोझी यांच्यासह विरोधी नेत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली.

डीएमके खासदार कनिमोझी यांनी सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, 'वल्लियूरजवळील कन्ननल्लूर येथे झालेल्या संघर्षादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पंचायत परिषद अध्यक्ष महाराजाजन यांची दगडफेक करून हत्या केल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. पिण्याच्या पाण्याच्या संकटाविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांशी बोलत असताना सरपंच यांची झालेली हत्या आणि आरोपींचे पलायन यावरून तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे हे दिसून येते. एआयएडीएमके सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे. याठिकाणी मुलांना, महिलांना आणि अगदी लोकप्रतिनिधींनाही कोणतीही सुरक्षा मिळत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील इटाभट्टी परिसरात LPG वाहून नेणाऱ्या ट्रकमधून गॅसची गळती

काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं

मुंबईहून 40 पर्यटकांचा ग्रुप नाशिकमध्ये आला, रामकुंडात स्नान करताना 5 जण बुडाले

Face Care: रोज मेकअप करता? मग चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा हा घरगुती क्लींजर, स्किन दिसेल नेहमी ग्लोइंग

EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

SCROLL FOR NEXT