Rahul gandhi Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi : लोकसभेचा सामना सुरु होण्याआधी २ सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं; राहुल गांधींची भाजपवर टीका

Rahul Gandhi Speech In ramleela : 'खेळाडूला विकत घेऊन कर्णधाराला घाबरून मॅच फिक्सिंग सुरु आहे. लोकसभेचा सामना सुरु होण्याच्या आधी आमच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं, अशा शब्दात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

Vishal Gangurde

Rahul Gandhi Speech :

'खेळाडूला विकत घेऊन कर्णधाराला घाबरून मॅच फिक्सिंग सुरु आहे. लोकसभेचा सामना सुरु होण्याच्या आधी आमच्या दोन सहकाऱ्यांना तुरुंगात टाकलं. सर्व यंत्रणा खरेदी करून भाजप १८० पेक्षा पुढे जाणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

आज रविवारी राजधानी दिल्लीत विरोधकांनी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं. इंडिया आघाडीने रामलीला मैदानात आयोजित केलेल्या 'महारॅली'मधून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. या सभेला राहुल गांधींनी हजेरी लावली. या सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

लोकसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतातील तीन ते चार अब्जाधीश लोक हे प्रयत्न करत आहेत. देशाला भविष्य दिलं. स्वप्न पाहण्याचा अधिकार दिला, ते संविधान बदलण्यासाठी ही मॅच फिक्सिंग सुरु आहे. ज्या दिवशी संविधान बदललं जाईल, तेव्हा हा देश संपून जाईल. संविधान देशाच्या लोकांचा आवाज आहे. संविधानाला संपवलं जाईल, तेव्हा देश नष्ट होऊन, राज्यांचे तुकडे होते.

हे विचार करत आहे की, ते माध्यमांशिवाय देश चालविण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील लोकांचा आवाज कोणीही दाबू शकत नाही. भाजपच्या खासदारने म्हटलं की, निवडणूक जिंकल्यांवर आम्ही संविधानाला बदलू. हे विधान चाचपणी करण्यासाठी केलं. संविधान गेल्यावर लोकांचे अधिकार, आरक्षण निघून जाईल.

गरीबांची संपत्ती चार-पाच लोकांच्या हाती जाईल. नोटाबंदीचा कोणाला फायदा झाला. भारतात बेरोजगारी आहे. हे संविधानाला का बदलू इच्छित आहे , कारण यांना अधिकार हिसकावून घ्यायचे आहे. जर तुम्ही मतदान केलं नाही तर त्यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. गरीब, शेतकरी, मागासवर्गीय , अनुसूचित लोकांसाठी ही निवडणूक आहे. मॅच फिक्सिंग करण्यात येत आहे, हे सर्वांना दिसत आहे.

आमचं त्यांनी बँक खाते बंद केलं. त्यांनी ६ महिन्याआधी केलं असतं तर काही फरक पडला नसता. पण त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर बँक खाते बंद केलं. भारतात, मॅच फिक्सिंगचा सामना भाजपने जिंकला तर, त्यानंतर संविधान बदललं जाईल, त्यानंतर देशाला आग लागेल. हा देश वाचणार नाही. लोकसभा निवडणूक ही देश आणि संविधानाला वाचविण्यासाठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

SCROLL FOR NEXT