Rahul Gandhi  Saam tv
देश विदेश

Rahul Gandhi News: PM मोदींच्या मंत्रिमंडळात नाराजी, सरकार कोसळू शकतं; राहुल गांधी यांचा मोठा दावा

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते, खासदार राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आकड्यांमधून देशातील राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदी सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे मोठे आव्हान असणार आहे. तसेच मोदी सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारबाबत मोठा दावा केला आहे. या मुलाखतीत म्हटलं की, 'भारतीय राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या एका चुकीमुळं सरकार पडू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नाराजी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आघाडी सरकारमधील खासदार भूमिका बदलू शकतात'.

राहुल गांधी यांनी पुढे म्हटलं की, 'लोकसभा निवडणुकीचा निकाल मोदी सरकारच्या विरोधात आला आहे. भाजप घृणा पसरवू शकते. द्वेष पसरवू शकते. भाजप त्याचा फायदा घेऊ शकते. पण या बाबींना देशातील जनतेने नकार दिला आहे'.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला. २०१४ आणि २०१९ वर्षांच्या निवडणुकीत बहुमत मिळवणाऱ्या भाजपने यंदा फक्त २४० जागा मिळाल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसने एकूण ९९ जागा जिंकल्या.

यंदा भाजप स्वबळावर २७२ जागांचा मॅजिक फिगर आकडा गाठू शकली नाही. त्यामुळे सरकार चालवण्यासाठी त्यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. एनडीएमध्ये २४० जागांसोबत भाजप मोठा पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रबाबू नायडू आहेत. त्यांच्याकडे १६ खासदार आहेत. तर नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडे १२ खासदार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT