Rahul Gandhi Latest News SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News : राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक परदेशात जाणार, काय आहे कारण?

Rahul Gandhi News : जयराम रमेश यांनी म्हटलं की,राहुल गांधी २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेतून ब्रेक घेणार आहेत. दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

प्रविण वाकचौरे

Rahul Gandhi News :

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्र सध्या उत्तर प्रदेशात आहे. मात्र राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा सोडून अचानक परदेशात जाणार आहेत. राहुल गांधी 26 फेब्रुवारीला आपल्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यानंतर पाच दिवसांनी ते पुन्हा राहुल गांधी ५ दिवसांनी पुन्हा एकदा भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं की,राहुल गांधी २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भारत जोडो न्याय यात्रेतून ब्रेक घेणार आहेत. दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राहुल गांधी यांची उपस्थिती गरजेची आहे. याशिवाय राहुल गांधी २७-२८ फेब्रुवाराला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथे जाणार आहेत. तिथे त्यांचा व्याख्यान आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर राहुल गांधी २ मार्चपासून पुन्हा भारत जोडा यात्रा सुरु करणार आहेत. त्यानंतर ५ फेब्रुवारीपर्यंत राहुल गांधी उज्जैन येथे जातील. तेथे ते महाकालेश्वर मंदिरात महाकालचे देखील दर्शना घेणार आहे, असं जयराम रमेश यांनी सांगितलं.

भारत जोडो यात्रेचा आज ३९ वा दिवस आहे. ही यात्रा आता उन्नाव येथे पोहोचली आहे. यात्रा कानपूरला पोहोचल्यानंतर 22 आणि 23 फेब्रुवारीला ब्रेक घेणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला हा प्रवास पुन्हा सुरू होईल. ही यात्रा मुरादाबाद येथून सुरू होईल आणि संभल, अलिगढ, हाथरस आणि आग्रा जिल्ह्यांमधून राजस्थानमध्ये प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT