Shreya Maskar
साटवली किल्ल्याला साटवली गढी असेही म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील साटवली गावात हे ऐतिहासिक ठिकाण आहे.
साटवली किल्ला मुचकंडी नदीच्या उत्तर काठावर, लांजा शहरापासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे.
साटवली किल्ला हे १७ व्या शतकातील एक मोक्याचे ठाणे होते, जे प्रादेशिक नदी-व्यापाराच्या संरक्षणासाठी बांधले गेले होते.
साटवली गावापासून अवघ्या १५ मिनिटांच्या चालत केलेल्या प्रवासात याचे पडके बुरूज, जुनी विहीर आणि नदीचे विहंगम दृश्य पाहता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुचकंडी नदीकाठचा व्यापार आणि टेहळणी यांसाठी हे एक मोक्याचे केंद्र म्हणून कार्यरत होते.
साटवली किल्ला हा १७ व्या शतकात आदिलशाही राजवटीत साटवली हे एक बंदर होते. स्थानिक नदी-व्यापारावर देखरेख व संरक्षण करण्यासाठी रत्नागिरीतील मुचकंडी नदीकाठी हा लहान किल्ला बांधण्यात आला होता.
साटवली किल्ल्याला जाण्यासाठी मुंबई ते रत्नागिरीपर्यंत ट्रेनने प्रवास करा. पुढे रत्नागिरी स्टेशनपासून पुढे साटवली गावापर्यंत रिक्षाने जा. त्यानंतर साटवली किल्ल्यापर्यंत ट्रेक करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.