PM Narendra Modi Speech Twitter/@ANI
देश विदेश

PM Narendra Modi Speech: भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, म्हणाले...

Independence Day 2022 : ज्यांनी देशाला लुटले त्यांच्याकडून ते परत मिळवता यावं, हा आमचा प्रयत्न आहे - पंतप्रधान मोदी

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

नवी दिल्ली : आज देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे आणि संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत म्हणून साजरा करत आहे. यानंतर नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी मोदींनी भष्टाचार आणि घराणेशाहीवर सडकून टीका केली आहे.

हे देखील पाहा -

लाल किल्ल्यावरुन देशाला केलेल्या संबोधनपर भाषणात मोदी म्हणाले की, भारतात भ्रष्टाचार आणि घराणेशाही रोखणे आवश्यक आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत लढा द्यावा लागेल. बँक दरोडेखोरांची मालमत्ता जप्त केली जात आहे. देशासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. पहिले आव्हान – भ्रष्टाचार आणि दुसरे आव्हान – घराणेशाही, परिवारवाद. भ्रष्टाचार देशाला ढेकणासारखा पोकळ करत आहे, देशाला त्याच्याशी लढावे लागेल. ज्यांनी देशाला लुटले त्यांच्याकडून ते परत मिळवता यावं, हा आमचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जेव्हा मी घराणेशाही आणि घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणावर बोलत आहे. नाही, दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील दुष्टाईने भारतातील प्रत्येक संस्थेत कुटुंबवाद पोसला आहे. ही मानसिकता जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांबद्दल द्वेष निर्माण होत नाही, त्यांना सामाजिकदृष्ट्या तुच्छतेने पाहण्यास भाग पाडत नाही तोपर्यंत संपणार नाही असं म्हणत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर हल्ला चढवला आहे.

पुढील २५ वर्षे ही आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची

दरम्यान पुढील २५ वर्षे ही आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपण स्वत:चीच प्रशंसा करत असू तर आपले स्वप्न दूर निघून जातील. त्यामुळे ७५ वर्षांचा कालखंड कितीजरी कठीण, चांगला असला तरी पुढील २५ वर्षे ही आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. याच कारणामुळे १३० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांकडे मी पाहत आहे. येणाऱ्या २५ वर्षांसाठी पंचप्राणावर आपली शक्ती केंद्रित करावी लागेल. जेव्हा स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील, तोपर्यंत आपल्याला सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करावे लागेल असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT