PM Modi Security Breach Saam Tv
देश विदेश

PM Modi Security Breach: सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी कशा आल्या याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींची चौकशी चार सदस्यीय समिती करणार आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत कोणत्या त्रुटी राहिल्या याचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंजाबमधील (Punjab) सुरक्षेतील त्रुटींची (PM Security breach) चौकशी चार सदस्यीय समिती करणार आहे. त्याचे नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​करणार आहेत. यासोबतच सध्याच्या सर्व तपास समित्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे.

चौकशी समितीत कोणाचा समावेश?

या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, डीजी एनआयए, डीजी चंदीगड आणि पंजाबचे सुरक्षा एडीजीपी यांचा समावेश असणार आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या (High Court) रजिस्ट्रार जनरलने या प्रकरणाशी संबंधित सर्व रेकॉर्ड समितीच्या अध्यक्षा इंदू मल्होत्रा ​​यांच्याकडे सोपवावे. तसेच समितीला या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

तर, सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप आपल्या आदेशात चौकशीच्या वेळेची मर्यादा निश्चित केलेली नाही. ही समिती लवकरात लवकर अहवाल देईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. सुरक्षेतील त्रुटींचे मूळ कारण काय याचा अभ्यास ही समिती करणार आहे. तसेच सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी इतर कोणते उपाय केले जाऊ शकतात याबद्दलही उपाय सांगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lock Upp 2: 'लॉक अप २'मधून सुनीता आहुजाची एक्झिट; पत्नीला घेण्यासाठी सेटवर पोहोचला गोविंदा

Shocking : रेशनकार्ड बनवून देतो पण..., तहसीलदार ऑफिसजवळ बोलावून ३० वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी

Skin Care Tips : हे पदार्थ खाल्ल्याने ७ दिवसातच चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

वारी म्हणजे काय? महाराष्ट्रात वारी कधीपासून सुरू झाली?| Pandharpur Wari 2026

Kidney Health: किडनी अटॅकचा धोका टाळायचाय? लगेचच आहारात घ्या या ७ गोष्टींचा समावेश

SCROLL FOR NEXT