Operation Sindoor Continue Saam Tv News
देश विदेश

India-Pakistan War : पुन्हा मोठं काहीतरी घडणार? शस्त्रसंधीनंतरही PM मोदींची तिन्ही सेनाप्रमुखांसोबत बैठक

Operation Sindoor Continue : भारत आणि पाकिस्तानने शनिवारी सुरू असलेल्या युद्धात युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पण आज भारतीय हवाई दलाच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानने शनिवारी सुरू असलेल्या युद्धात युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. पण आज भारतीय हवाई दलाच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लष्कराने सांगितले की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांनी, म्हणजेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाची पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक घेतली. आज रविवारी तिन्ही लष्करप्रमुख आपल्या युनिफॉर्मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएसची बैठक झाली. दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या (IAF) विधानाने खळबळ उडाली. भारतीय हवाई दलाने रविवारी त्यांच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, 'भारतीय हवाई दलाने (IAF) 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये त्यांची कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली. राष्ट्रीय उद्दिष्टांनुसार हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि गुप्ततेने पार पाडण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने, सविस्तर माहिती नंतर दिली जाईल.

त्यांनी अफवा टाळण्याचे आवाहन केले आणि म्हटले की, 'भारतीय हवाई दल सर्वांना अफवा आणि असत्यापित माहिती पसरवणे टाळण्याची विनंती करते.' पंतप्रधान मोदी तिन्ही लष्करप्रमुख, सीडीएस, एनएसए अजित डोवाल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेत असतानाच हवाई दलाचे हे विधान आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबाबत एक मोठी घोषणा केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ पूर्ण युद्धबंदीसाठी सहमती दर्शविली आहे, असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीने हा करार झाला आहे.

मुळात, युद्धबंदी उल्लंघनाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले की, लष्कराला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . त्यांनी सांगितले की, काही तासांतच पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यासाठी झालेल्या कराराचे उल्लंघन केले आहे.

विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते की, भारतीय सैन्य पूर्ण जोमाने प्रत्युत्तर देत आहे आणि सीमेवरील अतिक्रमण रोखण्यात गुंतले आहे . त्यांनी म्हटले होते की पाकिस्तानची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानची आहे. यापूर्वी, भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईबाबत एक मोठा निर्णय घेतला. भविष्यात कोणतीही दहशतवादी घटना भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल, असा कडक संदेश सरकारने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

SCROLL FOR NEXT