Rabiul Alam Chowdhury reverses withdrawal decision in Rejinagar bypoll 
देश विदेश

By-Election: पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी! टीएमसीच्या उमेदवाराचा यु-टर्न आधी 'नो नंतर हो'; मनधरणीनंतर थोपटले दंड

By-Election In West Bengal : रेजीनगर आणि नंदीग्राम जागांसाठी ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असून, ९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केले जातील. तृणमूल काँग्रेसच्या ममता गटाने या दोन्ही जागांसाठी उमेदवार उभे केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शनिवार आहे.

Bharat Jadhav

  • रेजिनगर पोटनिवडणुकीत रबिउल आलम चौधरी यांनी उमेदवारी माघारीचा निर्णय बदलला.

  • ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चेनंतर पुन्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले.

  • रेजिनगर आणि नंदीग्राममध्ये 6 ऑक्टोबरला मतदान, तर 9 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

पश्चिम बंगालमधील रेजीनगर मतदारसंघात एक मोठी राजकीय नाट्य घडत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणारे रबिउल आलम चौधरी यांनी आपली भूमिका बदलली असून ते आता पोटनिवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार केल्याचे रबिउल आलम यांनी सांगितले. ते शनिवारी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,रबिउल चौधरी हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं ममता बॅनर्जींना समजलं त्यानंतर त्यांनी रबिउल चौधरी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. चौधरी यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती ममता बॅनर्जी यांनी केली. या दोन नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि अखेरीस, ममता यांनी रबिउलला त्याची उमेदवारी मागे न घेण्याबाबत राजी केले. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरूच ठेवणार असून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा केवळ एकच कार्यकर्ता जरी आपल्या पाठीशी उभा राहिला, तरीही आपण ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 'दीदीं'शी चर्चा केल्यानंतर मी तो निर्णय बदलला. दीदींनी मला आश्वस्त केले आहे. मी त्यांच्या पक्षाचा सदस्य आहे आणि त्या सांगतील तसे मी करेन."

नंदीग्राममध्ये ममता यांना फटका

रेजीनगर आणि नंदीग्राम येथील पोटनिवडणुका ६ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्यांचे निकाल ९ ऑक्टोबरला जाहीर केले जातील. तृणमूल काँग्रेसच्या ममता गटाने या दोन्ही जागांसाठी उमेदवार उभे केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शनिवार आहे. नंदीग्राम मतदारसंघासाठी ममता बॅनर्जी यांनी उमेदवारी दिलेल्या तृणमूलच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी पुण्याच्या तरुणाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: गडचिरोली - पोटेगावकडे जाणारी ST बस उलटली, 20 ते 25 प्रवासी जखमी

Latest Mangalsutra Design: छोटं की लांब; तुमच्यासाठी कोणतं मंगळसूत्र उठून दिसेल

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी! कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द; हुबळीतूनच दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT