Chhatarpur Truck Auto Accident  Saam TV
देश विदेश

Accident News : बागेश्वर धामला निघालेल्या भाविकांच्या रिक्षाला भीषण अपघात; ५ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

Satish Daud

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. बागेश्वर धामच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या रिक्षाने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून (Police) ओळख पटवणे सुरू आहे. अपघातात ७ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लोक बागेश्वर धामच्या दर्शनसाठी जात होते. मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ते छतरपूर रेल्वेस्थानकावर (Railway Station) उतरले. तेथून त्यांनी बागेश्वरधामकडे जाण्यासाठी रिक्षा मागवली.

या रिक्षात तब्बल १२ जण बसले. झाशी खजुराहो महामार्ग NH 39 वर रिक्षा आली असता, रिक्षाचालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच रिक्षाने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की संपूर्ण रिक्षाचा चक्काचूर झाला. या घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाने रुग्णालयात जीव सोडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. स्थानिकांनीही पोलिसांना मोठी मदत केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT