Iran Israel War Impact On Indian News Saam Tv
देश विदेश

Iran Israel War Update : इस्रायल-इराणच्या युद्धाचा भारतीयांना फटका, विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अकडले, लेटेस्ट अपडेट आली समोर

Iran Israel War Impact On Indian News : इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने पुणे, विदर्भ आणि शहापूरमधील प्रवाशांची चिंता वाढली असून भारत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.

Alisha Khedekar

  • इराण-इस्रायल संघर्षामुळे दुबई आणि सौदीत तणाव वाढला

  • हवाई सेवा बंद झाल्याने हजारो महाराष्ट्रातील नागरिक परदेशात अडकले

  • विदर्भातील ५ हजार भाविक आणि शहापूरचे २३ ज्येष्ठ नागरिक अडचणीत

  • भारत सरकारने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आवाहन केले

अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील नागरिक परदेशात अडकले आहेत. पुणे, विदर्भ, शहापूर अशा अनेक भागांतील नागरिक अडकले असून स्वदेशी परतण्यासाठी भारताकडे मदतीची मागणी करत आहेत.

विदर्भातील ५ हजार नागरिक रमजान निमित्त गेले असता युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदीत अडकले आहेत. शिवाय ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील २३ ज्येष्ठ नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे नागरिक देखील फिरण्यासाठी टूर्स च्या मध्यमातून दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२:४५ वाजता फ्लाइटने ते स्वदेशी परतणार होते. मात्र या युद्धामुळे विमान सेवा रद्द झाली असल्याने हे सर्व भारतीय नागरिक दुबईतील ए 1 फहादी स्ट्रीटवरील ग्रँड अॅस्टोरिया हाॅटेलमध्ये थांबले आहेत.या नागरिकांच्या नावांची यादी देखील समोर आली आहे. याचा फटका सर्वसामान्यांसोबत अभिनेत्री आणि खेळाडूंना देखील बसला आहे.

इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून पहिला हल्ला करण्यात आला. या युद्धाची ठिणगी शनिवारी दुपारपासून पडली. तेहरानसह इराणच्या अनेक भागांत इस्रायलने आतापर्यंत २०० हून अधिक हल्ले केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या १० मोठ्या शहरांवर भीषण हवाई हल्ले केलेत.

या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला असून संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या युद्धाजन्य परिस्थितीचा जगभरात परिणाम होत आहे. अनेक विमाने रद्द झालेली आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसून आला. दिल्ली, मुंबई, पुण्यातून आखाती देशातील विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक नागरिक प्रदेशात अडकून आहेत. दरम्यान भारतीय नागरिकांनी घाबरून न जाता शांततेने परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI : तिलक वर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार? महत्त्वाच्या सामन्याआधी प्लेईंगवर ११ वर अपडेट

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिक्षण मंडळाच्या बैठकीला उपस्थित

Gold Rate Today: युद्धामुळे दर गगणाला भिडणार! सोनं प्रति तोळा ₹९४३० ने वाढले, तर चांदीला २०,००० रुपयांची चकाकी, वाचा आजचे दर

Famous Actress : संन्यास घेतलेल्या अभिनेत्रीचे २५ वर्षांनी धमाकेदार कमबॅक, 'या' शोमध्ये झळकणार

मोठी बातमी! पुण्यातील ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक युद्धात अडकले, दुबईतून मोठी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT