India Vs Pakistan Saam Tv
देश विदेश

India Vs Pakistan: आम्ही भारताची ५ लढाऊ विमाने पाडली, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा बोगस दावा, भारत प्रत्युत्तर देत म्हणाला...

India Vs Pakistan: भारत पाकिस्तानमध्ये तणाव अजूनच वाढत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. मात्र, भारताने हा दावा फेटाळला आहे.

Siddhi Hande

७ मे रोजी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. पहलगाम हल्ल्याचा बदला पाकिस्तानने घेतला आहे. पहलगाम हल्ला २२ एप्रिल रोजी झाला होता. त्यात २६ पर्यटक मारले गेले होते. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहे. यानंतर आता पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे.

भारताची ५ लढाऊ विमाने पाडली- पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी संसदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मी आपले एअर चीफ जहीर बाबर यांना मी तुमच्याकडून, पाकिस्तनच्या संपूर्ण जनतेकडून सलाम करत आहोत की त्यांनी आणि त्यांच्या टीमने हिंदुस्तानच्या ५ लढाऊ विमानांना पाडले आहे. त्यात ३ राफेलचा समावेश आहे. हिंदुस्थाननेन जेव्हा रात्री पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानमधील ६ शहरांना टार्गेट केले तेव्हा पाकिस्तानच्या एअर चीफने हे काम केले आहे.

भारताने पाकिस्तानमध्ये ८० विमाने पाठवली होती.यासाठी पाकिस्तानच्या तिन्ही सेना अनेक दिवसांपासून तयारी करत होत्या. ज्यामुळेच पाकिस्तानने भारताची लढाऊ विमाने पाडली, असा दावा त्यांनी केला आहे.

भारताने दावा फेटाळला

पाकिस्तानने भारताचे ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला आहे. परंतु भारताने हा दावा फेटाळला आहे. भारताच्या सैन्याने काल पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे तिन्ही सैन्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT