FIR Against Bharat Jodo Nyay Yatra  Saam TV
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra : 'भारत जोडो न्याय यात्रा' आणि आयोजकांविरोधात FIR दाखल, काय आहे कारण?

FIR Against Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेने जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले, एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

Bharat Jodo Nyay Yatra :

'भारत जोडो न्याय यात्रा' आणि त्याचे मुख्य आयोजक केबी बायजू यांच्याविरुद्ध FIR दाखल झाला आहे. गुरुवारी आसाममधील जोरहाट शहरामध्ये परवानगी दिलेल्या मार्गात बदल केल्याने हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, परवानगीनुसार केबी रोडकडे जाण्याऐवजी मोर्चाने शहरात वेगळे वळण घेतले आणि यामुळे परिसरात गोंधळाी स्थिती निर्माण झाली. लोकांच्या अचानक गर्दीमुळे काही लोक पडले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

यामुळे यात्रा आणि मुख्य आयोजकांविरुद्ध जोरहाट सदर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. भारत जोडो न्याय यात्रेने जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन केले नाही आणि त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले, एफआयआरमध्ये म्हटलं आहे. (Latest Marathi News)

आसामचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं की, भारत जोडो न्याय यात्रा शहरातून जाऊ नये, असं आम्ही आधीच सांगितलं आहे. जो काही पर्यायी मार्ग मागितला जाईल, त्याला परवानगी दिली जाईल. मात्र शहरातून जाण्याचा आग्रह असेल तर आम्ही पोलिस बंदोबस्त करणार नाही.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधींनी सोशल मीडिया X वर लिहिलं की, आसाममध्ये पोहोचल्यानंतर मला मणिपूर आणि नागालँडच्या लोकांकडून जितके प्रेम मिळाले तितकेच प्रेम इथे मिळाले. तुमच्या वेदना, तुमच्या समस्या आणि तुमच्यावर होत असलेला भयंकर अन्याय समजून घेणे हा आमच्या भेटीचा उद्देश आहे.

आसाम सरकार हे भाजपच्या रूपाने द्वेषाच्या खतातून जन्माला आलेले भ्रष्टाचाराचे पीक आहे. आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे काम केवळ द्वेषाच्या नावाखाली जनतेचा पैसा लुटणे आहे.

पैशाची ताकद आसामच्या लोकांच्या शक्तीला कधीही पराभूत करू शकत नाही. आपल्याला या अन्यायाविरुद्ध लढायचे आहे आणि असा आसाम निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक हाताला रोजगार मिळेल आणि ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव सदैव समृद्ध राहील, असं राहुल गांधींनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT