Agro News : शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणी केल्यानंतर तरूणाने हात स्वच्छ धुतले नाहीत. घरी परतल्यानंतर जेवणानंतर त्याचा मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. शेतामध्ये फवारणी केल्यानंतर २७ वर्षीय तरूणाने हात धुतले नाही, थेट जेवण केलं, त्यामुळे कीटकनाशकमधील केमिकल त्याच्या पोटात गेलं अन् मृत्यू झाला. तरूणाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील २७ वर्षीय कन्हैया दिवसभर थेतात राबला. किटकनाशक पिकावर फवारण्याचं काम झालं. त्याने हात धुतलेच नाहीत. तो घरी बरतला अन् जेवण केलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मथुरामधील महावन कस्बे येथे तो राहत होता. कन्हैयाच्या निधाननंतर परिसरात खळबळ उडाली आहे. कन्हैच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
रिपोर्ट्सनुसार, कन्हैया शेतातून घरी परतला, त्यानं जेवायला सुरूवात केली. पत्नीने जेवणाआधी हात धुण्याचा सल्ला दिला. पण त्याने बायकोचा सल्ला ऐकला नाही. त्याने किटकनाशकाच्या हातानेच जेवण केलं. त्यामुळे केमिकल त्याच्या पोटात गेलं अन् मृत्यू झाला.
महावन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैयाची जेवणानंतर तब्येत बिघडली. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. पोलिसांनी त्यानंतर मृतदेह कुटुंबाला दिला. पोलीस अधिकारी रंजना यांनी या घटनेनंतर नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. किटकनाशकाचा वापर केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुण्याचा सल्ला त्यांनी दिलाय.
कन्हैया याच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली, लोकांनी दु:ख व्यक्त केलेय. शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवावेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, किटकनाशकातील केमिकल खूपच विषारी असते. शरिरात गेल्यास धोकादायक ठरू शकते. त्यामुळे किटकनाशकाचा वापर करत असाल तर सावध राहावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.