Corona Virus Saam Tv
देश विदेश

Corona : कोरोना विषाणूची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तब्बल 3 वर्षांनी समोर आली धक्कादायक माहिती

तब्बल ३ वर्षांनी कोरोना विषाणू कशामुळे पसरला, त्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जगात चीनमध्ये प्रथम कोरोनाने हाहाकार केला. कोरोनाने भारतात ३० जानेवारी रोजी शिरकाव केला. त्यानंतर भारतात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला. या कोरोना विषाणूची नेमकी उत्पत्ती कशी झाली, याबाबत कोणतीही ठोस माहिती चीनकडून आली नव्हती. त्यानंतर तब्बल ३ वर्षांनी कोरोना विषाणू कशामुळे पसरला, त्याची माहिती समोर आली आहे. हा विषाणू वटवाघूळ, उंदिर यापासून पसरला नसून रॅकून कुत्र्यापासून (Raccoon Dogs) पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, संशोधकांनी २०२० मध्ये चीनच्या हुनान प्रांतातील सीफूड होलसेल मार्केट आणि त्याच्या जवळील भागातून जेनेटिक डेटा फॉर्म नमुने (स्वॅब) गोळा करण्यात आले. यानंतर या नमुन्यांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यातील अनेक नमुन्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तर प्राण्यांना घेऊन जाणारे वाहने, पिंजऱ्यांचेही नमुने गोळा करण्यात आले. इन्फ्लुएंजाचे रुग्ण वाढत असताना कोरोनाचे गेल्या चोवीस तासात ७९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

तपासात आढळून आले की, अनेक नमुन्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. यात रॅकून कुत्र्यांसह इतर प्राण्यांचे साहित्य होते. मात्र, रॅकून कुत्रे (Dog) कोरोनाबाधित होते. परंतु त्यांच्यामुळे विषाणू माणसांमध्ये पसरल्याची पुष्टी मिळाली नाही. तसेच विषाणू हा रानटी जनावरांमुळे पसरतो अशीही माहिती समोर आली आहे.

अँजेला रासमुसेन या नावाच्या विषाणूशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, बाजारात अनेक प्राणी हे विषाणूने बाधित होते. दरम्यान, चिनी (China) लोकांनी आधीच नमुन्यांची चाचणी केली होती आणि कोणत्याही प्राण्यामध्ये SARS-CoV-2 असल्याचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT