Bharat Jodo Nyay Yatra Saam Digital
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या नेतृत्वात निघणाऱ्या भारत न्याय यात्रेचं नाव बदललं

Bharat Jodo Nyay Yatra News: भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

Bharat Jodo Nyay Yatra

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता इंफाळ मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. याआधी भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं होतं. मणिपूर (इंफाळ) मधून यात्रेला सुरुवात होणार असून यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. महाराष्ट्रात 5 दिवस यात्रा असून नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई अशा 6 जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा 66 दिवस यात्रा चालणार आहे. तर देशातील 110 जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास असेल.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, राज्य प्रभारी, राज्य युनिट प्रमुख आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना, काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मतभेत बाजूला ठेवण्याचा आणि माध्यमांमध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी न्याय यात्रेचं नाव बदलण्याची घोषणाही केली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तळागाळातील लोकांशी संवाद साधणार आहेत. त्याच्या समस्या अडचणी समजून घेणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक दिवशी दोन सभा होणार आहेत, शक्यतो या सभा कॉर्नर सभा असतील. काही ठिकाणी मोठ्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक, भिवंडी, मुंबई या ठिकाणी मोठी सभा होतील. तर BKC मुंबईत यात्रेची सांगता होण्याची शक्यता आहे.

खर्गे म्हणाले, भाजप सरकार गेल्या १० वर्षातील आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नव्या उर्जेने पुढे येऊन काम करावं लागेल. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवावे लागतील. टीकेत गुंतू नका, मीडियामध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. कॉंग्रेस अरुणाचल प्रदेश सोडत असल्याच्या वृत्ताचं यावेळी त्यांनी खंडण केलं. यापूर्वी १४ राज्य होती मात्र आता अरुणाचल प्रदेशचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसात लोगो आणि थीम सॉन्ग लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT