PM Narendra Modi Saam Digital
देश विदेश

Free Ration Scheme: पुढील 5 वर्षे 80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PMGKAY: पुढील 5 वर्षे 80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Satish Kengar

Free Ration Scheme:

छत्तीसगडमधील दुर्ग येथे निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरिबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळत राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेचा देशातील 80 कोटींहून अधिक लोकांना फायदा होणार आहे.

जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "मी ठरवले आहे की, भाजप सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव मला असे पवित्र निर्णय घेण्यासाठी शक्ती देत आलं आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतात. 30 जून 2020 रोजी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी ती पुढील पाच वर्षांसाठी लागू ठेवण्याबाबत बोलले आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना?

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना/पॅकेज हे गरिबांसाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे सर्वसमावेशक मदत पॅकेज आहे. मार्च 2020 मध्ये सर्वात गरीब लोकांपर्यंत अन्न आणि पैसे पोहोचवण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती, जेणेकरून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यात आणि आवश्यक गरजा पूर्ण करण्यात अडचणी येऊ नयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT