नवी दिल्ली - कोरोना Corona या आजाराचा धोका लक्षात घेऊन सीबीएसईने CBCE २०२१-२०२२ या नवीन सत्रामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात Exam सीबीएसईने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. २०२१-२०२२ या नवीनसत्रापासून वर्षातून दोन वेळा परिक्षा घेण्यात येणार आहे. याचा आराखडा सीबीएसईने तयार केला असून यासंबंधीचे परिपत्रक बोर्डाने जारी केले आहे. यात परीक्षा कशा पद्धतीने होईल, सिलॅबस कसा असेल, अंतर्गत मूल्यमापनाचे धोरण काय असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
हे देखील पहा -
सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ -२०२२ हे शैक्षणिक वर्षाचे २ टर्ममध्ये विभाजित करण्यात आले आहे. दोन्ही टर्ममध्ये ५०-५० टक्के अभ्यासक्रम पुर्ण होईल आणि त्यानंतर परिक्षा घेतल्या जाणार आहेत. पहिल्या सत्राची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर दुसऱ्या सत्राची परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे अशी माहित सीबीएसईकडून देण्यात आली आहे.
कोरोनाकाळात शाळा व कॉलेज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. यासाठी वर्षातून २ वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षा जरी वर्षातून दोनदा होणार असल्या तरी अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.