नांदेड जिल्ह्यातही होणार कोल्हापूरच्या धर्तीवर गुळ प्रक्रिया उद्योग सुरु

जिल्ह्यात सिंचनाची सोय असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांचा कल ऊस या नगदी पिकाकडे आहे. शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याकडे देतात. गेल्या काही वर्षांत आरोग्याप्रती नागरिकांत जागरुकता निर्माण झाल्याने साखरेच्या तुलनेत बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे.
नांदेड जिल्ह्यात होणार गुळ प्रक्रिया उद्योग
नांदेड जिल्ह्यात होणार गुळ प्रक्रिया उद्योग

नांदेड : जिल्ह्यातील गुळ प्रक्रिया उद्योगास चालना मिळावी यासाठी कोल्हापुरच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यात गुळ प्रक्रिया उद्योगास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कृषी विभागाने याविषयी एक शासनादेश काढला आहे. या गुळ प्रक्रिया उद्योगाचा नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील गुळ प्रक्रिया उद्योगास मान्यता मिळाली असून यासाठी काँग्रेसचे नांदेड तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे यांनी मागणी केली होती.

जिल्ह्यात सिंचनाची सोय असलेल्या बहुतांश शेतकर्‍यांचा कल ऊस या नगदी पिकाकडे आहे. शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याकडे देतात. गेल्या काही वर्षांत आरोग्याप्रती नागरिकांत जागरुकता निर्माण झाल्याने साखरेच्या तुलनेत बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे. यामुळे साखर कारखान्याप्रमाणेच जिल्ह्यात गुळ प्रक्रिया उद्योग असावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून होत होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे यांनी संबंधित विभागाकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर गुळ प्रक्रिया उद्योगासाठी नांदेड जिल्ह्याचा समावेश करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.

हेही वाचा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून दुष्काळी भागातील रुग्णांना मोठा दिलासा...

यासमवेतच अ‍ॅड. निलेश पावडे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाची प्रत देत जिल्ह्यात गुळ प्रक्रिया उद्योग असणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले होते. गुळ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय झाल्यास ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यात या उद्योगामुळे हातभार लागेल यासाठी अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला.

या पाठपुराव्यास यश आले असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर गुळ प्रक्रिया उद्योगासाठी नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या- गटांना कृषी व्यवसाय घटकांतर्गत जिल्ह्यात पाच शेतकरी गट व सहा शेतकरी उत्पादक कंपनी यांना 50. 28 लाख व 65. 17 लाख इतके साह्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार असून यातून ग्रामीण भागात रोजगारांच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com