Earthquake saam Tv
देश विदेश

Earthquake: थरारली धरणी...आसामसह त्रिपुरा आणि मेघालय भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले!

Earthquake: आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकं घाबरून घराबाहेर पळाले.

Bharat Jadhav

Earthquake:

आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये आज संध्याकाळच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.२ इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज संध्याकाळी ६.१५ वाजता मेघालयसह तिन्ही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. उत्तर गारो हिल्समध्ये केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की काही लोक भीतीनं घराबाहेर पळाले.

ईशान्येत भूकंपाचे धक्के जाणवणं हे एका महिन्यात सलग दुसऱ्यांदा घडलंय. याआधी ११ सप्टेंबर रोजी आसामसह ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या म्हणण्यानुसार, रात्री ११ वाजता भूकंप झाला होता. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर ५.१ इतकी नोंदवली गेली होती. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू उखरुल जिल्हा होता. हा केंद्रबिंदू मणिपूरपासून ६६ किमी अंतरावर होता.

परंतु हे भूकंप आसाम तसेच अरुणाचल प्रदेशातही जाणवले होते. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरच्या मते सप्टेंबरमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या २० किमी खोलीवर होता. हरियाणामध्ये एक दिवसापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप केंद्रानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतक होता. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर २.६ इतकी नोंदवली गेली होती. रात्री अंदाजे ११.२६ मिनिटांनी भूकंपाचे हे धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT