वृत्तसंस्था Twitter/@ANI
देश विदेश

राजस्थानमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि बस धडकेत आगीचा भडका; पाच जणांचा होरपळून मृत्यू

राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.

वृत्तसंस्था

जयपूर : राजस्थान बाडमेरमध्ये प्रवासी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि जोरात धडकेमुळे या गाड्यांनी तात्काळ पेट घेतला. या दुर्घटनेत आगीमुळे पाच प्रवाशांचा होरपळून 5 People died मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य Rescue work सुरू करण्यात आले आहे. अपघातातील Accident जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात Hospitalized दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी CM Of Rajsthan घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी प्रवासी बसमध्ये एकूण २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. त्यानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला अशी माहिती आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT