Shivsena Sanjay Raut vs Eknath Shinde Group Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : शिंदेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही; उद्धव ठाकरे पहिल्या पाचमध्ये होते, राऊतांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Satish Daud

Sanjay Raut News : एकनाथ शिंदे यांना कुणी मुख्यमंत्री मान नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maharashtra Political News)

खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची प्रगती, विकास काहींना पाहावत नव्हता, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. सरकारने सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला विकत घेतलं आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

मुळात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कुणी मुख्यमंत्री मान नाही. त्यांचं नाव देशातील पहिल्या १० मुख्यमंत्र्यामध्येही नाही हे दुर्देवी आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये होते, त्यानंतर ते चारमध्ये आले. हळूहळू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्या क्रमांकावर जाण्याची गती पकडत असताना हे सरकार पाडण्यात आलं. कुठेतरी महाराष्ट्राचे पंख कापले जावे, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास काही लोकांना पाहावत नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, तुम्ही आनंदउत्सव साजरा करण्याच्या तयारीला लागा, अशा प्रकारची भाषा जर हे लोकं करीत असतील. याचा अर्थ सुप्रीम न्यायालय आणि निवडणूक आयोगाला यांनी विकत घेतलं आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

त्याचबरोबर शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार याचा निकाल अजून लागायचा आहे आणि निकाल लागण्याआधीच या सर्वांनी (शिंदे-भाजप) जाहीर केलं आहे की आम्हीच जिंकतो आहे. याला काय म्हणायचं? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांना नोटीस बजावायचं काही कारण नाही. त्यांनी ज्या उद्योहपती बद्दल जे प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर द्यायला हवे होते. त्यांना संधी होती. खरतर त्यांनी हक्कभंग केला आहे सभागृहाचाआणि आमचा . हक्कभंग त्यांनी लेकभावनेचा भंग केल हा पलायनवाद आहे पळपुटेपणाच आहे. तुम्हा नियमांचा आधार घेवून नोटीसा पाठवत आहात हीच हुकूमशाही आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT