shiv sena mns alliance News 
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : छत्रपती शिवरायांची शपथ घ्यायची, त्यानंतरच....राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी नेमकी काय अट ठेवली?

shiv sena mns alliance News : राज ठाकरे यांनी दिलेल्या युती प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी, अशी अट ठेवली. “चोरांना कळत-नकळत पाठिंबा द्यायचा नाही,” असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Responds to Raj Thackeray’s Alliance Offer : राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासमोर एक अट घातली आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची राज ठाकरेंनी शपथ घ्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या टाळीला टाळी दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांकडून युतीचे संकेत दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण जुळणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरेंनीही राज ठाकरेंना टाळी देण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची माझीही तयारी आहे. पण चोरांना कळत-नकळत पाठिंबा द्यायचा नाही किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, हे आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगा. त्यानंतर टाळी द्यायची हाळी द्यायची हे ठरवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या प्रस्तावावर नेमकं काय म्हणाले ?

मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठी माणसाने मराठीसाठी एकत्र यावे. पण माझी एक अट आहे. लोकसभेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये उद्योग घेऊन जातात, तेव्हाच विरोध केला असता तर आज केंद्रात ते सरकार बसले नसते. महाराष्ट्राच्या हिताचे सरकार केंद्रात आणि महाराष्ट्रात बसले असते.

त्याचवेळी कामगार कायदे कचऱ्यात फेकले असते. तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा. परत तडजोड करायची; पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या घरी जाणार नाही, घरी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा अन् मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा.

माझ्याकडून भांडणं नव्हतीच. पण जी काही होती ती मिटवून टाकली. पण महाराष्ट्राचे हित ठरवा. सर्व मराठी माणसाने ठरवायचे, माझ्यासोबत जायचे की भाजप, गद्दार सेनेसोबत जायचे? कुणासोबत जाऊन मराठी, हिंदुत्वाचे हित होणार आहे, ते ठरवा. मग काय तो पाठिंबा द्यायचा तो द्या.. बिनशर्त पाठिंबा दिला तरी चालेल.

महाराष्ट्राचे हित ही एकच अट आहे. चोरांना कळत-नकळत पाठिंबा द्यायचा किंवा प्रचार करायचा नाही, ही आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घ्यायची. त्यानंतर टाळी द्यायची हाळी द्यायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT