Udayanraje Bhosale Talks on Political Crisis In Maharashtra Saam TV
मुंबई/पुणे

"आघाडी अनैसर्गिक होती, हे तर होणारच होतं"; शिंदेंच्या बंडखोरीबाबत उदयनराजेंचा मविआला टोला

Political Crisis In Maharashtra : शिवसेनेचे जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. तर १० अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदार हे देखील एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सामील झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. शिवसेनेचे जवळपास ४० आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले आहेत. तर १० अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदार हे देखील एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सामील झाले आहेत. याबाबत सर्वच राजकीय पक्षांकडून आणि नेत्याकडून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. (Udayanraje Bhosale Talks On Maharashtra Political Criris)

हे देखील पाहा -

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, याला भूकंप म्हणता येणार नाही, हे होणारच होतं. राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, याला भूकंप म्हणता येणार नाही, हे होणारच होतं. ज्यावेळी वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांनी घेतलेला हा निर्णय, निवडून आणलेल्या आमदारांचा विचार करुन हा निर्णय घेतला असता तर आघाडी झाली नसती असंही उदयनराजे म्हणाले. तसेच ही आघाडी सत्ता स्थापनेसाठी होती आणि फार काळ टिकणारं नव्हती. हे अनैसर्गिक होते असा टोलाही उदयराजे भोसले म्हणाले होते. तसेच जर ते महाविकास आघाडी म्हणून राहिले तर त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची आमदारकी असेल असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT