मुंबई/पुणे

जनतेला प्रश्न पडला आहे; भाजप नेत्यांना कशासाठी आशिर्वाद द्यायचा- बाळासाहेब थोरात

भाजपने देशात एकतरी चांगलं काम केलं आहे का यामुळे यांना देशात आशिर्वाद मागायचा अधिकार नाहीच आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भाजपा नेते नारायण राणेंची जनआशीर्वादJanaashirwad Yatra यात्रा सुरु झाली आहे याच जनाशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणेNarayan Rane यांनी 'उद्धव ठाकरेUddhav thackeray सरकारचे दिवस भरेल असून आता आपणाला सरकार स्थापण करायच आहे' अस वक्तव्य केलं होत या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीMVA मधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरातBalasaheb Thorat यांनी भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेवरती चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले जनतेला प्रश्न पडला आहे यांना कशासाठी आशिर्वाद द्यायचा आणि का द्यायचा म्हणून यांनी देशात एकतरी चांगलं काम केलं आहे का यामुळे यांना देशात आशिर्वाद मागायचा अधिकार नाहीच आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही.The public is questioning; Why bless BJP leaders

हे देखील पहा-

आधीच कोरोना काळातCorona Period जनआशीर्वाद यात्रा काढण्यावरुन देशभरातून विरोधी पक्षOpposition भाजपवरती टीका करत आहेत आणि अशातच राज्यात विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपच्या नेत्यांची जनआशीर्वाद यात्राJanaashirwad Yatra सुरु झाली आणि नेहमीच आपल्या बोलण्यातून उध्दव ठाकरेंवरती निशाणा साधणारे नारायन राणे यांनी उद्धव सरकराचे आता दिवस संपले आहेत आणि राज्यात आपणाला सरकार स्थापण करायच आहे असं वक्तव्य केल होतं.

मात्र भाजपने देशात एक काम नीट केलं नाही उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे काय हाल झाले हे संपुर्ण देशाने पाहील आहे त्यामुळे भाजपाला देशात जनआशीर्वाद मागण्याचा अधिकार नाही आणि महाराष्ट्रात तर नाहीच नाही शिवाय राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे देशात उत्कृष्ट काम करणार सरकार असल्याचही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

कोरोना काळ असो वा अनेक नैसर्गिक संकटNatural disasters मध्ये जे राज्य सरकारने काम केलं त्याचे कौतुक सगळीकडे सुरु आहे. आणि महाविकास आघाडी सरकार जाईल हे आज जाईल उद्या जाईल अशी विरोधक दिवसा स्वप्न बघत आहेत असल्याचीही टिका यावेळी थोरात यांनी केली.

मविआ सरकार परत येईल

पुन्हा होणाऱ्या निवडणूक एकत्र लढू आणि हे सरकार परत येईल असा विश्वास ही थोरातांनी व्यक्त केला. तसेच भाजपवाले कोरोना काळात राजकारण करत आहेतएकीकडे गर्दी होण्यासारखे कार्यक्रम करत आहेत आणि दुसरीकडे म्हणत आहेत नियम पाळा यावरुणच त्यांनी जनतेची काळजी नाही हे दिसून येत आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT